Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीये.. त्यातच प्रकाश आंबेडकर यांना महायुतीत येऊन मंत्रिपद घेण्याची ऑफर देण्यात आलीय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झालाय..
आगामी विधानसभा निवडणुसाठी महाविकास आघाडी आणि महायुती कडून जोरदार तयारी सुरु आहे.. तर छोट्या पक्षांनीही आघाड्यांच्या माध्यमातून कंबर कसलीये.. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 'एकला चलो रे' ची हाक दिलीये..
भाजपसोबत 2014 पासून असलेल्या रामदास आठवले यांना मोदींच्या मंत्रिमंडळात तिस-यांदा मंत्रिपदाची संधी मिळालीये.. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आठवलेंनी आता आंबेडकरांना महायुती येण्याचं आवाहन करत मंत्रिपदाची ऑफर दिलीये.. प्रकाश आंबेडकर एकटे लढून सत्तेत येऊ शकत नाही, तर आंबेडकरांनी सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे, असंही आठवलेंनी म्हटलंय..
1990 मध्ये प्रकाश आंबेडकर सोबत राहिले असते तर त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं असतं, असा गौप्यस्फोटही रामदास आठवले यांनी केलाय.मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आलो तर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळ चित्र दिसू शकतं, असं विधान रामदास आठवलेंनी केलंय..निवडणुकीचे पडघम सुरू झालेत, त्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांना मंत्रिपदाची ऑफर दिलीये. त्यामुळे आठवलेंच्या ऑफरवर प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात, की आठवलेंच्या ऑफरकडे दुर्लक्ष करतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे..
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं पहिली यादी जाहीर केलीय.. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील 11 मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केलीय.. यामध्ये प्रथमच तृतीयपंथी समुदायाला प्राधान्य देण्यात आलंय.. रावेर विधानसभा मतदारसंघातून तृतीयपंथी समुदायाच्या शमीभा पाटील यांनी उमेदवारी देण्यात आलीय.. तर ऑक्टोबर महिन्याच्या दुस-या आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याचा अंदाज प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलाय....
Prakash Ambedkar Maharashtra Politics प्रकाश आंबेडकर महायुती
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय प्रयोग; संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजरत्न आंबेडकर तिघांनी निर्णय घेतलाMaharashtra Politics : महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणाराय.. रणनितीसाठी युती, आघाडीच्या बैठका सुरू झाल्यात.. त्यातच राज्यातील छोट्या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार सुरू केलाय.. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या आघाडीच्या नांदीचा प्रयोग होऊ शकतो.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार! एक नाही दोन गट तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीतMaharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तिस-या आघाडीची चर्चा सुरू आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी एका नव्या आघाडीची घोषणा केलीय. आंबेडकरांनी कोणत्या पक्षांची मोट बांधत नवीन आघाडी स्थापन केलीय पाहूयात.
और पढो »
'मला काही सांगायचं'... '50 खोके एकदम ओके'... महाराष्ट्राच्या सत्तानाट्याचा तिसरा अंकmaharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात घडलेल्या घडामोडी एखाद्या चित्रपट किंवा नाटकाहून अधिक रोचक होत्या.
और पढो »
अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
और पढो »
मुंबईकरांचा प्रवास अधिक सूकर होणार, पश्चिम रेल्वेने केला मोठा बदल, मुंबई लोकलवर आता...Mumbai Local Train Update: मुंबईकरांना आता प्लॅटफॉर्मवर बसूनही कोणती ट्रेन येणार याची माहिती मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने मोठा बदल केला आहे.
और पढो »
जान्हवीच्या बॉयफ्रेंडला साधा समजू नका; आजोबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पंजाबचे राज्यपाल...Who is Shikhar Pahariya: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा प्रियकर शिखर पहारिया लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. शिखर पहारिया सोलापूरमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
और पढो »