Maharashtra Politics : राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्लॅन असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी अमित शाहांवर केला आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून निकालाच्या पुढील 48 तासात सरकार स्थापन करावे लागणार आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केलाय...
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीये..महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकाचा निकाल आहे. मात्र निकालाच्या पुढील 48 तासात सरकार स्थापन करावे लागणाराय. मात्र, हा वेळ पुरेसा नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय.. निकालानंतरच्या 48 तासांत सरकार बनले नाही तर विधानसभेचा कालावधी संपणार आणि नवी विधानसभा अस्तित्वात आली नाही म्हणून राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची शिफारस राज्यपाल करतील. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं अमित शाह यांचं षडयंत्र आहे, असाही गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय.
अमित शाह हे महाराष्ट्राचे एक नंबरचे शत्रू असून एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे त्या महाराष्ट्रातल्या दुश्मनांचे हस्तक असल्याचा घणाघातही संजय राऊत यांनी केलाय. एकिकडे मविआकडून महायुतीवर मतदारयादीतील घोटाळ्यावरून आरोप सुरु आहे.. हे असतानाच संजय राऊत यांनी आता राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा कट असल्याचा आरोप केल्यानं राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे..
Maharashtra Politics Sanjay Raut Amit Shah Impose President Rule In The State संजय राऊत अमित शहा विधानसभा निवडणूक राष्ट्रपती राजवट
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहटीला जाणारMaharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची चागंलीच चर्चा रंगली आहे.
और पढो »
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार: प्रकाश आंबेडकरविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वेगवान पडद्याआड राजकीय घडामोडी घडत आहेत. टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात मोठा दावा केलाय.
और पढो »
BJP Government : सनातन धर्म रक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना होणार? विधानसभेच्या तोंडावर नवा मुद्दाSanatan Dharma : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवीन मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. सनातन धर्म रक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करा अशी मागणी थेट राष्ट्रपतींकडे करण्यात आलीय.
और पढो »
काँग्रेसचे उमेदवार अजून ठरले नाहीत आणि मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच, हायकमांडच्या दारात पोहोचला वादMaharashtra Assembly Election: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपांवरुन अंतिम निर्णय झाला नसताना काँग्रेसमध्ये (Congress) मात्र अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळून येताना दिसत आहे.
और पढो »
सर्वसामान्यांना सरकारचा मोठा दिलासा! मुंबईच्या 5 टोल नाक्यांवर टोलमाफी; 'या' तारखेपासून अंमलबजावणीविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना शिंदे सरकारचा मोठा दिलासा दिलाय. मुंबईच्या एन्ट्री पॉइण्टवरील 5 टोल नाक्यांवर टोलमाफीचा निर्णय घेतलाय.
और पढो »
Breaking News LIVE: बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपीला शुभम लोणकरची मदतदिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे.
और पढो »