मुंबईतील समुद्रामध्ये नौदलाच्या स्पीड बोटीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीला धडक दिल्याने 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
मुंबईतील समुद्रामध्ये नौदलाच्या स्पीड बोटीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीला धडक दिल्याने 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मृतांमध्ये 2 बालकांचाही समावेश आहे. या अपघातानंतर बेपत्ता असलेल्या दोन प्रवाशांचा शोध दुसऱ्या दिवशीही सुरु आहे. मात्र नेमकं काय घडलं याबद्दलची माहिती नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या स्पीड बोटचा अपघात झाला तिचं इंजिन नव्यानेच बसवण्यात आलं होतं. या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे. नेमकं या बोटीसंदर्भात काय घडलं? तांत्रिक अडचण का आणि कशी निर्माण झाली याबद्दलचा शोध घेण्यासाठी सविस्तर, सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे. प्रथम दर्शनी हा अपघात नव्याने बसवलेल्या इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळेच झाल्याचं सांगितलं जात आहे. या बोटीचं नियंत्रण कोणाच्या हाती होतं याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या बोटीवर नौदलाचे दोन अधिकारी आणि त्यांच्यासोबतीने इतर चार सहकारी होते. पण अपघात झाला तेव्हा बोट कोण चालवत होतं याबद्दलची माहिती समोर येत आहे.'एखाद्या बोटीचा इंजिन किंवा इतर मोठा भाग बदलला जातो तेव्हा त्याच्या सखोल चाचण्या घेतल्या जातात. ऐनवेळी काही गोंधळ होऊ नये म्हणून सर्व काळजी घेतली जाते. उदाहरण सांगायचं झालं तर जर इंजिन बनवणाऱ्या कंपनीने इंजिनची क्षमता 140 किलोमीटर प्रती तास इतकी असेल तर नौदलाकडून त्यांच्या हा दावा तपासून पाहिला जातो. अशीच चाचणी अपघात झाला तेव्हा सुरु होतील,' अशी माहिती नौदल अधिकाऱ्यांनी दिली आहे. अपघात झाला तेव्हा बोटीवर चार नौदल अधिकाऱ्यांबरोबरच 2 ओरिजनल इक्विपमेंट मॅनफॅक्चरर (ओईएम) सुद्धा होते. या अपघातामध्ये नौदलाचे महेंद्र सिंग शेखावत आणि दोन ओईएम प्रविण शर्मा आणि मंगेश नावाच्या तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे
NAVY SPEED BOAT FERRY ACCIDENT DEATH MUMBAI TECHNICAL FAULT
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुंबईच्या जवळील फेरी नीलकमलचा अपघात, १३ जणांचा मृत्यूमुंबईच्या जवळ बुधवारला एका फेरी नीलकमलचा अपघात झाला, यात १३ जण मृत्यू झाला तर 66 जणांना वाचवण्यात आले.
और पढो »
मुंबईच्या कुर्ला स्टेशन जवळ मोठा अपघात, 3 जणांचा मृत्यू, बेस्ट बस मार्केटमध्ये घुसलीमुंबईच्या कुर्ला स्टेशन परिसरात मोठा अपघात झाला आहे. यात अनेकजण जखमी झाले आहेत. तर पाच पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
और पढो »
कठुआ आग हादसा: दम घुटनेने 6 ठहले मृतजम्मू-कश्मीरच्या कठुआ येथे एका घरात दम घुटण्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे बोट बुडाल्याने १३ जणांचा मृत्यूमुंबई येथे गेटवे ऑफ इंडियाच्या जवळील बोट बुडाल्यामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. एलिफंटाकडे जाताना येथे एका नेव्हीच्या बोटने बोटला धडकून बुडवले.
और पढो »
एलिफंटा बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यूएलिफंटा बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नौदलाच्या स्पीड बोटने दिलेल्या धडकेमुळे गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला निघालेली फेरी उलटली आणि ही दुर्घटना घडली. शासनाच्या सर्व यंत्रणांना कामी लागल्या आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत दिली जाईल. तसंच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी शासनाच्या आणि नौदलाच्या वतीने केली जाईल.
और पढो »
गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला जाणाऱ्या बोटीचा अपघातगेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे आणि ५ जण बेपत्ता आहेत.
और पढो »