Maharashtra Politics : धाराशिवचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
' काँग्रेस - राष्ट्रवादी शी आपलं जमलं नाही, मांडीला मांडी लावून बसलो तरी उलट्या होतात' शिंदेंच्या नेत्याचं अजब विधान
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी अजब विधान केलं आहे. धाराशिवचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 'काँग्रेस-राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यात जमलं नाही. आज जरी मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर येऊन उलट्या होतात' असं वादग्रस्त विधान तानाजी सावंत यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीया वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
धाराशिवमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना तानजी सावंत यांनी आपण हाडाचा शिवसैनिक असून काँग्रेस-राष्ट्रवादीशी आपलं कधीच जमलं नसल्याचं म्हटलं आहे. आज मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात, सहन होत नाही' असं व्यक्तव्य केलं.शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने त्यांना उत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा धर्म पाळतोय, परवा निलेश राणे काहीतरी बोलले, सदाभाऊ खोत काहीतरी बोलले आता तानाजी सावंत यांचं हे वक्तव्य म्हणजे महायुती टिकवायची ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि अशापद्धतीने कोणी मिठाचा खडा टाकतायत त्यांनी जाब विचारायचा नाही का? असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.
तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, आम्ही महायुतीचा धर्म म्हणून शांत आहोत, याचा अर्थ आम्ही गप्प बसतो असा होत नाही, आम्ही तोडीसतोड उत्तर देऊ शकतो, पण मला माझ्या पक्षाने काही मर्यादा घालून ठेवल्या आहेत, त्यामुळे मी यावर बोलणार नाही, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांचा इलाज तात्काळ करावा असंही मिटकरी यांनी म्हटलं आहे.
Tanaji Sawant Controversial Statement Congress NCP Ajit Pawar Group Amol Mitkari Mahayuti Tanaji Sawant Controversial Statement About Congr तानाजी सावंत काँग्रेस राष्ट्रवादी वादग्रस्त विधान
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बाटलीला तोंड लावून पाणी पिताय? आत्ताच ही सवय सोडा, अन्यथा...Health Tips In Marathi: बाटलीला तोंड लावून पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते. त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात जाणून घेऊया.
और पढो »
'लोकांनी माझी हत्या केली तरी चिंता नाही,' ऑलिम्पिकमधील भारताच्या खराब कामगिरीवर सुनील छेत्री स्पष्ट बोललाSunil Chhetri on India Poor Performance in Olympics 2024: 150 कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारताची ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवताना मात्र दमछाक होते. भारताच्या या खराब कामगिरीवर भारताचा दिग्गज फुटबॉल खेळाडू सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) नाराजी जाहीर केली असून, खडेबोल सुनावले आहेत.
और पढो »
'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असेपर्यंत....', संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले 'हा कचरा..'Sanjay Raut on Devendra Fadnavis: महाराष्ट्रात फडणवीस (Devendra Fadnavis) असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.
और पढो »
'...तो वाचला नाही पाहिजे', बदलापूरमधील घटनेवरुन संताप व्यक्त होत असतानाच PM मोदींचं मोठं विधानकोलकातामधील बलात्कार आणि हत्या (Kolkata Rape and Murder) तसंच बदलापूरमधील (Badlapur Sexual Assault) घटनेनंतर संताप व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महिलांवरील अत्याचारावर भाष्य केलं आहे.
और पढो »
'मुंबईतल्या टॉवर्समधली 60% घरं मराठी मध्यमवर्गीय राखीव असा कायदा करा, कारण...'; ठाकरे गटाची मागणीMumbai Towers Home Reserved: शेवटी ही मुंबापुरी कुणासाठी हे ठरल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असं म्हणत त्यांनी टॉवर्समधला मतदार महाराष्ट्रावर प्रेम करीत नाही, असा दावा केला आहे.
और पढो »
'बहिणीचं नातं भावाला कळलंच नाही, '1500 रुपयांना नातं विकलं जात नाही हो'Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीला तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर मविआनं निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. मविआच्या मेळाव्यात सुप्रिया सुळेंनी लाडकी बहिण योजनेवरुन अजित पवारांना चांगलाच टोमणा मारला आहे.
और पढो »