Maharashtra CM Oath Ceremony in Mumbai: महायुतीचा आज संध्याकाळी शपथविधी पार पडणार आहे. मात्र अद्यापही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार आहेत की नाही हे स्पष्ट नाही. त्यातच उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. निमंत्रण पत्रिका बाबतीत एकत्र बसून निर्णय घेतला होता.
Mahayuti Oath Ceremony: जर शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारलं नाही तर आम्ही...; उदय सामंत यांचं मोठं विधान
Mahayuti Oath Ceremony: महायुतीचा आज संध्याकाळी शपथविधी पार पडणार आहे. मात्र अद्यापही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार आहेत की नाही हे स्पष्ट नाही. त्यातच उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.महायुतीचा आज संध्याकाळी शपथविधी पार पडणार आहे. मात्र अद्यापही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार आहेत की नाही हे स्पष्ट नाही. त्यातच उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. निमंत्रण पत्रिका बाबतीत एकत्र बसून निर्णय घेतला होता. आम्ही शासनाच्या फॉरमॅट नुसार छापली आहे.
"एकनाथ शिंदे यांनी जर उपमुख्यमंत्रीपद स्विकारलं नाही आणि आमच्यापैकी कोणावर जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न केला तर आम्हीदेखील ते स्विकारणार नाही अशी आमची भूमिका आहे. एकनाथ शिंदे यांना आम्ही आमच्या भावना सांगितल्या आहेत. सगळ्यांचं राजकीय करिअर त्यांच्या हातात दिलं आहे. त्यामुळे त्यांना डावलून काही केलं जात असेल तर शांत बसणार नाही," असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
"अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आमची स्पष्ट भूमिका आहे की एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री शपथ घ्यावी. आम्ही कोणीही उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक नाही. एकनाथ शिंदेच उपमुख्यमंत्री होतील अशी खात्री आहे. जर त्यांनी पद स्वीकारलं नाही तर आम्हीही कोणतेही पद स्वीकारणार नाही. पण तेच उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील असा विश्वास आहे," असं उदय सामंत म्हणाले आहेत."आमचं करिअर त्यांच्या हातात आहे. त्यांना डावलून कोण काही करत असेल तर ते अयोग्य आहे. काही जण चुकीच्या बातम्या पसरवत आहेत.
निमंत्रण पत्रिका बाबतीत एकत्र बसून निर्णय घेतला होता. आम्ही शासनाच्या फॉरमॅट नुसार छापली आहे. एक तासाभरात निर्णय स्पष्ट होईल. साहेब उपमुख्यमंत्री स्वीकारणार की नाही ते स्पष्ट होईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कॅबिनेटमध्ये जर शिंदे नसतील तर कोणीही कॅबिनेटमध्ये नसेल अशी भूमिका आपली आहे का? असं विचारल असता आमही नकारात्मक विचार करत नाही, आम्हाला खात्री आहे ते शपथ घेतीलीच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Shapath Vidhi Azad Maidan देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार महायुती महाराष्ट्र सरकार Maharashtra New CM
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महायुतीच्या शपथविधीची जय्यत तयारी, कुणाकुणाची वर्णी लागणार?Mahayuti Oath Ceremony: भाजपनं अद्याप विधीमंडळ नेत्याची नियुक्ती केलेली नाही.
और पढो »
Photos: शिवरायांचं जगातील सर्वात मोठं मंदिर महाराष्ट्रात नाही तर या राज्यात; अमित शाहांनीही घेतलंय दर्शनBiggest Chhatrapati Shivaji Maharaj Temple In World: सध्या राज्यातील राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरांच्या मुद्द्यावरुन तापलेलं असतानाच खरोखरच जगातील सर्वात मोठं शिवाजी महाराजांचं मंदिर कोठे आहे तुम्हाला माहितीयेत का? या मंदिरातील काही खास फोटो आणि इतिहास जाणून घेऊयात...
और पढो »
'एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही केवळ....' उदय सामंत यांचं विधानUday Samant on Maharashtra CM Post: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला. यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले. पण एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार असे वाटत असताना मोदी-शहा जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असे त्यांनी सांगितले.
और पढो »
Mahayuti Oath Ceremony: एकनाथ शिंदेंचं नेमकं काय ठरलंय? अखेर झालं स्पष्ट, शिवसेना नेता म्हणाला 'आमचं करिअर...'Mahayuti Oath Ceremony: महायुतीचा आज संध्याकाळी शपथविधी पार पडणार आहे. मात्र अद्यापही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार आहेत की नाही हे स्पष्ट नाही. त्यातच उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
और पढो »
Eknath Shinde Press Conference: अडीच वर्षांच्या कार्यकाळावर मी समाधानी; एकनाथ शिंदे यांचं मोठं विधानEknath Shinde Press Conference: विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन वाद सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
और पढो »
...तर महाविकास आघाडी महायुतीविरोधात एकसुद्धा उमेदवार देणार नाही; जाहीर सभेत ठाकरेंचं विधानUddhav Thackeray Kolhapur Radhanagri Rally Speech: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच प्रचार सभेमध्ये केलेलं हे विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मंचावर जाहीर भाषणात त्यांनी असं का म्हटलं जाणून घेऊयात
और पढो »